ठाणे जिल्ह्यात खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी जाण्याचे सत्र सुरूच आहे. भिवंडीमध्ये रविवारी सकाळी अशीच घटना घडली. नदीनाक्याच्या पुलावर खड्ड्यामुळे दुचाकीचा वेग कमी करताच मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.

आतापर्यंत खड्ड्यांनी घेतले चार बळी
ठाणे जिल्ह्यात खड्ड्यांनी आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. ५ जुलै रोजी घोडबंदर रस्त्यावरील काजूपाडा येथे खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये मोहनिश अहमद इरफान खान या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यानंतर बदलापूर पाइपलाइन मार्गावर खड्ड्यात दुचाकी आदळली. यामुळे तरुण रस्त्यावर पडून त्याचा बसखाली चिरडून मृत्यू झाला. २३ जुलै रोजी मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोळी नाक्यापासून काही अंतरावर खड्ड्यात दुचाकी गेल्याने दुचाकीवरील दोघे तोल जाऊन रस्त्यावर पडले. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेले ब्रिजेशकुमार उर्फ मुनीकाका लेढा जैसवार यांच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. आता पुन्हा भिवंडीमध्ये खड्ड्यामुळे एका जेष्ठ नागरिकाला प्राण गमवावे लागले आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.