Kolhapur News : पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफ जवानांच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून एनडीआरएफच्या या टीम कोल्हापूरमध्येल तळ ठोकून आहेत.

आज देशभरात बहिण भावाच्या नात्याचा आनंद द्विगुणित आणि वृद्धिंगत करणारा रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. या पवित्र सणाच्या दिवशी आपल्या रक्षणासाठी आलेल्या एनडीआरएफ जवानांना कोल्हापुरातील महिला भगिनींनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा पार पाडला.

एनडीआरएफचे जवान आपलं रक्षण करण्यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना राखी बांधून या जवानांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील महिलांनी केला आहे. यामध्ये राजश्री गायकवाड, अर्चना कोरे, श्रेया मर्दाने वेदश्री गायकवाड आदी महिला भगिनींचा समावेश होता. एनडीआरएफच्या जवानांनी देखील या महिला भगिनींचे आभार मानून आमच्या सर्व जवानांना अशाच पद्धतीने प्रेम मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here