मुंबई: अन्नाला चव मिठामुळे येते. मात्र आता मिठालादेखील महागाईची झळ बसणार आहे. स्वयंपाकामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि किचनचा अविभाज्य भाग असणाऱ्या मिठाचा दर लवकरच वाढणार आहे. देश का नमक अशी ओळख असणाऱ्या टाटा मिठाची किंमत वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत कंपनीनं दिले आहेत.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीईओ आणि एमडी असलेल्या सुनील डिसुझा यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी दरवाढीचे संकेत दिले. महागाईमुळे दबाव वाढत आहे. त्यामुळे महसूल घटत आहे. नफा कमी होत चालला आहे. त्यामुळे आम्ही दरवाढीची तयारी करत आहोत, असं डिसुझा म्हणाले.
पुण्यातील ‘रुपी बँके’चा परवाना रद्द, आता खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
मिठाचा दर दोन घटकांच्या आधारे ठरतो. ब्राईन आणि एनर्जी यामुळे मिठाची किंमत निश्चित होते. सध्या ब्राईनची किंमत स्थिर आहे. पण एनर्जीचा दर वाढला आहे. त्याचा परिणाम नफ्यावर होत आहे. त्यामुळेच कंपनीनं दरवाढीची योजना आखली असल्याचं डिसुझा यांनी सांगितलं.

मिठाची किंमत किती वाढणार आणि ती कधीपर्यंत वाढणार याबद्दल डिसुझा यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या टाटा मिठाच्या एका पॅकेटची किंमत २८ रुपये इतकी आहे. देशात सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड अशी मीठ उद्योगात टाटा नमकची ओळख आहे.
गृहकर्जावर आता अधिक व्याज द्यावा लागेल, या बँकेने ग्राहकांना दिला झटका
टाटा कंझ्युमरनं कालच पहिल्या तिमाहीतील कंपनीच्या नफ्यातोट्याची आकडेवारी जाहीर केली. जून तिमाहीत कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ३८ टक्क्यांनी वाढून २५५ कोटींवर गेला आहे. आता टाटा मिठाची किंमत वाढणार असल्यानं त्याची झळ ग्राहकांना बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here