Loksabha Election Maharashtra Politics | आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यापैकी ३० जागा युपीएला मिळतील म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळतील. तर भाजपप्रणित एनडीएची १८ जागांपर्यंत घसरण होईल. हा भाजपसाठी खूप मोठा धक्का असेल. भाजप आणि शिवसेनेने २०१९ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४२ जागांवर विजय मिळवला होता.

 

Uddhav Thackeray Devendra Fadnavis (5)
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • सत्तांतरानंतर शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हे भाजपसोबत गेले आहेत
  • राज्यातील सत्तांतर राज्यातील जनतेला फारसे आवडलेले नाही
  • महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यापैकी ३० जागा युपीएला मिळतील
मुंबई: राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर लोकसभेच्या आगामी निवडणुकीत म्हणजेच २०२४ मध्ये महाराष्ट्रातील जनता कोणाच्या बाजूने कौल देईल, याचे आडाखे आतापासूनच बांधण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला संपवून २०२४ मध्ये शिंदे गटाच्या सहाय्याने राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकहाती जिंकण्याचा भाजपचा (BJP) मानस आहे. मात्र, जनतेची सध्याची भावना पाहता आता लगेच लोकसभा निवडणूक झाली तर भाजप आणि शिंदे गटाला (Eknath Shinde Camp) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीने एकत्र राहून निवडणूक लढवल्यास शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. (Loksabha Election Survey)
बिहारमध्ये उलथापालथ होताच शिवसेना प्रचंड आशावादी; २०२४ च्या निवडणुकीबाबत मोठा दावा
इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. त्यावरून भाजप आणि शिंदे गटाने घडवून आणलेले सत्तांतर राज्यातील जनतेला फारसे आवडलेले नाही, याविषयी त्यांच्या मनात रोष आहे, असे अनुमान काढायला वाव आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या या सर्वेक्षणानुसार, आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यापैकी ३० जागा युपीएला मिळतील म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळतील. तर भाजपप्रणित एनडीएची १८ जागांपर्यंत घसरण होईल. हा भाजपसाठी खूप मोठा धक्का असेल. भाजप आणि शिवसेनेने २०१९ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४२ जागांवर विजय मिळवला होता.
शिवसेनेच्या चिन्हाबाबत शरद पवारांचा शिंदेंना महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हे भाजपसोबत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडे अवघे ६ खासदार शिल्लक आहे. या गणितानुसार शिंदे गट आणि भाजपच्या सध्याच्या खासदारांची संख्या ३६ इतकी आहे. मात्र, आजघडीला तातडीने लोकसभा निवडणूक झाल्यास हा आकडा १८ जागांपर्यंत खाली घसरेल. त्यामुळे भाजपच्या सरळसरळ ५० टक्के जागा कमी होतील. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अर्थात येणाऱ्या काळात परिस्थिती बऱ्याच अंशी बदलू शकते. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवल्यास उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना पक्ष जाऊ शकतो. त्यामुळे पुढील परिस्थिती कशी असेल, यावर लोकसभेच्या निकालाची बरीच समीकरणे अवलंबून आहेत. मात्र, तुर्तास राज्यातील जनमताचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here