नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याने मोदी सरकारच्या आवाहनानुसार देशभर १३ ते १५ ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. मात्र, या महोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा येथील वैशाली सोमनाथ बेंडकोळी या गर्भवती महिलेला चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शुक्रवारी गावातील वैशाली यांना प्रसुतीच्या कळा सुरू झाल्याने तिला शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी नातलगांनी चिखलातून पायपीट करत चक्क तीन किलोमीटर झोळी करून तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारविना घटना या गावात नेहमीच्या झालेल्या आहे तीन वर्षांपूर्वी देखील सर्पदंशाने एका युवतीचा मृत्यू झाला होता. अजून किती दिवस अशा संकटांचा सामना करावा लागणार असा गावकरी प्रश्न विचारत आहे.

पुजाराच्या अंगात सेहवाग संचारला; गोलंदाजांची बेदम धुलाई, २२ चेंडूत अर्धशतक तर…
मुख्य रस्त्यापासून ८ किलोमीटरवर असलेल्या अंबोली येथील शासकीय रुग्णालयात या महिलेने एका मुलीला जन्म दिला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावाजवळ मेटकावरा व हेदपाडा ही दोन गावे आहेत. ३०० लोकवस्ती असलेल्या हेदपाडा गावातील लोकांना दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची समस्या भेडसावते. या गावात जाण्यासाठी रस्ता मंजूर असतानाही नेहमी डांबरीकरणाऐवजी मातीचा रस्ता तयार केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होत असल्याने दुचाकी नेणेही मुश्किल होते. त्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी कामाला लागावं, पूजा अर्चा होमहवनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं, जयंत पाटलांचा टोला

1 COMMENT

  1. I would like to thank you for the efforts you have put in penning this website. Im hoping to see the same high-grade content by you in the future as well. In fact, your creative writing abilities has encouraged me to get my own website now 😉

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here