धुळे : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे खातेवाटपही जाहीर केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्री राहिलेल्या दादा भुसे यांना शिंदे सरकारमध्ये दुय्यम दर्जाचे मंत्रिपद दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे भुसे यांना कालपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र त्यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नव्हता. अखेर आज दादा भुसे यांनी धुळे येथे बोलताना खातेवाटपावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर ध्वजारोहणासाठी आले असता म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या मंत्रिपदावर नाराज नाही, उलट माझ्या मागणीनुसारच हे मंत्रिपद मिळाले असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

Independence Day:स्त्रियांचा अपमान करण्याची सवय सोडा, मुलगा आणि मुलीला समानतेने वागवा: पंतप्रधान मोदी

‘यापूर्वी मिळालेल्या कृषी विभागात काम करत असताना वारंवार होणारा प्रवास, अवकाळी पावसामुळे प्रत्येक ठिकाणी नुकसानी संदर्भात पोहोचताना होणारा त्रास लक्षात घेत मीच हे खातं नको, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही तेव्हा सांगितलं होतं आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनाही तेच सांगितलं. त्यामुळे मला मिळालेल्या नव्या खात्याबाबत मी समाधानी आहे,’ असा खुलासा दादा भुसे यांनी केला आहे.

परभणी जिल्हा हादरला! एकाच दिवशी नदीपात्रात दोन महिलांचे मृतदेह सापडले

दरम्यान, दादा भुसे यांनी शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबाबतही भाष्य केलं आहे. ‘शासनातर्फे नियम बनवले जातातच परंतु, नियमांचे आपण पालन किती करतो याचे आत्मचिंतन करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे,’ असं सांगत मंत्री दादा भुसे यांनी अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणं देखील तितकंच आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here