Maharashtra Cabinet Expansion | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना महिलांना आदर देण्याची भाषा केली होती. त्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मोदींना प्रत्युत्तर दिले. मोदींनी प्रथम केंद्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करावं, असे पेडणेकर यांनी म्हटले. याविषयी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आपल्याकडे अगोदरच खूप प्रकारची आरक्षणं आहेत.

हायलाइट्स:
- अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला
- महाराष्ट्र हा सध्या पायाभूत क्षेत्रात मागे पडला आहे
- आता नव्या सरकारला ही उणीव भरून काढण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागणार आहे
यावेळी अमृता फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नसल्याबद्दल विचारणा झाली. तेव्हा अमृता फडणवीस यांनी म्हटले की, महिलांना नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे. पण महिलांनी मंत्रिपदाची डिमांड करण्यापेक्षा पुरुषांएवढीच मेहनत करून त्या पदावर कमांड मिळवली पाहिजे. त्यावेळी महिलांना जास्त मान मिळेल, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना महिलांना आदर देण्याची भाषा केली होती. त्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मोदींना प्रत्युत्तर दिले. मोदींनी प्रथम केंद्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करावं, असे पेडणेकर यांनी म्हटले. याविषयी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आपल्याकडे अगोदरच खूप प्रकारची आरक्षणं आहेत. त्यामुळे माझं मत असं आहे की, माझी प्रतिनिधी असलेल्या महिलेने मेहनतीन पुढे यावे आणि ती जागा पटकावावी. त्यामध्ये तिला जो आदर मिळेल, तो कशातच मिळणार नाही, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. महाराष्ट्र हा सध्या पायाभूत क्षेत्रात मागे पडला आहे. त्यामुळे आता नव्या सरकारला ही उणीव भरून काढण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागणार आहे. नव्या सरकारला माझ्या शुभेच्छा. त्यांच्या काळात महाराष्ट्राने वेगाने घोडदौड करावी, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
मी ‘सामना’ वाचत नाही: अमृता फडणवीस
यावेळी अमृता फडणवीस यांना ‘सामना’तून शिंदे-फडणवीस सरकारवर करण्यात आलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले. त्यावर अमृता फडणवीस यांनी म्हटले की, ‘सामना’बाबत मला काही माहिती नाही. त्यांचे विचार वेगळे आहेत. माझ्यासाठी जनतेचे प्रतिनिधी असणाऱ्या प्रसारमाध्यमांचे विचार महत्त्वाचे आहेत, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. यावेळी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेवरही भाष्य केले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने ज्वलंत उदाहरण समोर ठेवले आहे. महाराष्ट्रात घराणेशाही संपवण्याच्या दिशेने भाजपने एक पाऊल पुढे टाकल्याचे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.