मुंबई : “सरकार येऊन काही दिवसच झाले. पण सत्ताधारी पक्षाचे आमदार धमकीची, मारामारीची भाषा करतात. मूळ प्रश्नांपासून लक्ष भरकटविण्यासाठी दुसरेच उद्योग करतात. हिंगोलीचे आमदार संतोष बांगरांनी (Santosh Bangar) एका मॅनेजरला मुस्काटीत मारली तर इकडे मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी देताना तंगड्या तोडा सांगितलं. महाराष्ट्रात चाललंय काय? आमदारांचं असं वागणं शिंदे-फडणवीसांना मान्य आहे काय? मी त्यांना थेटच विचारणार आहे. पण मला त्या दोन आमदारांना विचारायचंय, सत्ता आली म्हणू काय मस्ती आली काय?”, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटाच्या राडेबाज आमदारांना झापलं.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session Of Maharashtra Legislative) उद्यापासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सत्ताधारी शिंदे गट-भाजपने विरोधकांना चहापानाचं निमंत्रण दिलं. परंपरेनुसार विरोधकांनी (काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना) सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. हे सरकार अविश्वासाच्या पायावर उभं असून सत्ता स्थापन करताना संविधानिक मुल्यांच्या चिंधड्या शिंदे-फडणवीसांना उडवल्या आहेत, असा हल्लाबोल करत या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले, “हिंगोलीतले आमदार संतोष बांगर यांनी एका मॅनेजरला मुस्काटीत मारल्या. इकडे मुंबईतले आमदार प्रकाश सुर्वे कार्यकर्त्यांना चिथावणी देताना गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण समोरच्यांना धडा शिकवा, तंगड्या तोडा, अशी भाषा वापरली. एखाद्याला चूक उमगल्यावर तो दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. पण इकडे माफी मागायची लांबची गोष्ट पण गुन्हे दाखल व्हायची वाट पाहतायेत. पोलिसांना माझं आवाहन आहे, या राडेबाड आमदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करा. आत्ताच सत्ता आली. सत्ता येऊन जास्त दिवसही झाले नाहीत, त्यांना सत्तेची हवा एवढी डोक्यात चढली…”

मविआ सरकार लबाड निघालं, लबाडा घरचं आवताण जेवल्याशिवाय खरं नसतं, फडणवीसांची ठाकरेंवर टीका
शिंदे सरकार लोकशाहीच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं

शिंदे-फडणवीस सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं हे सरकार अद्याप विधीमान्य नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत तारखा सुरु आहेत. निवडणूक आयोगात प्रकरण सुरु आहे. सुप्रीम कोर्टात याचा निवाडा झाला नाही, असं अजित पवार म्हणाले.

शिंदे सरकार लोकशाही, संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं,अजित पवारांचा हल्लाबोल
अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. आम्ही त्यांना १७ ते २७ तारखेदरम्यान अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पुढील वेळी विचार करु, असंही अजित पवार म्हणाले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here