राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session Of Maharashtra Legislative) उद्यापासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सत्ताधारी शिंदे गट-भाजपने विरोधकांना चहापानाचं निमंत्रण दिलं. परंपरेनुसार विरोधकांनी (काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना) सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. हे सरकार अविश्वासाच्या पायावर उभं असून सत्ता स्थापन करताना संविधानिक मुल्यांच्या चिंधड्या शिंदे-फडणवीसांना उडवल्या आहेत, असा हल्लाबोल करत या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले, “हिंगोलीतले आमदार संतोष बांगर यांनी एका मॅनेजरला मुस्काटीत मारल्या. इकडे मुंबईतले आमदार प्रकाश सुर्वे कार्यकर्त्यांना चिथावणी देताना गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण समोरच्यांना धडा शिकवा, तंगड्या तोडा, अशी भाषा वापरली. एखाद्याला चूक उमगल्यावर तो दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. पण इकडे माफी मागायची लांबची गोष्ट पण गुन्हे दाखल व्हायची वाट पाहतायेत. पोलिसांना माझं आवाहन आहे, या राडेबाड आमदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करा. आत्ताच सत्ता आली. सत्ता येऊन जास्त दिवसही झाले नाहीत, त्यांना सत्तेची हवा एवढी डोक्यात चढली…”
शिंदे सरकार लोकशाहीच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं
शिंदे-फडणवीस सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं हे सरकार अद्याप विधीमान्य नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत तारखा सुरु आहेत. निवडणूक आयोगात प्रकरण सुरु आहे. सुप्रीम कोर्टात याचा निवाडा झाला नाही, असं अजित पवार म्हणाले.
अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. आम्ही त्यांना १७ ते २७ तारखेदरम्यान अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पुढील वेळी विचार करु, असंही अजित पवार म्हणाले.
Your article is a perfect article without a hitch. Thank you. My site: Most Used Blackjack Counting Systems