अहमदनगर : सतत सुरू असलेल्या पावसाने अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. निळवंडे धरणासह प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रवरा नदी देखील दुथडी भरून वाहू लागल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाजवळ प्रवरा नदीपात्रावरील पुलावरून पिकअप गाडी नदीत कोसळून वाहून गेल्याची घटना सोमवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे. या गाडीत ड्रायव्हरसह आणखी दोनजण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती असून प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे.

आज मंगळवारी सकाळी गावातील ग्रामस्थ पुलावरून प्रवास करताना त्यांना संशय आला आणि ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकहून काच घेऊन आलेली पिकअप गाडी पिंपरणे येथे माल खाली करून काल रात्री ९ वाजेच्या दरम्यान माघारी निघाली. मात्र, ती गाडी पुन्हा नाशिकला पोहचली नाही. पुलाला असलेले छोटे कठडे तुटलेले असल्याने आणि चालकाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन त्याच परिसरात दाखवत असल्याने ही गाडी नदी पात्रात कोसळली असल्याची पोलिसांची खात्री झाली आहे.

मुनगंटीवारांचं फर्मान, ‘वंदे मातरम म्हणा’, काँग्रेसचा नवा नारा, कार्यकर्त्यांना आदेशही दिले
नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. मात्र, नदीवरील पुलाला सुरक्षित कठडे नसल्याने ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तिघांसह पिकअप वाहून गेल्याची घटना घडल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सर्वसामान्यांना अल्प दिलासा, जुलै महिन्यात घाऊक महागाईत दरात घट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here