गाझीपूर : १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत असताना खुनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका आईनेच रागाच्या भरात आपल्या ३ निष्पाप मुलांना विष पाजलं. पण सगळ्यात गंभीर बाब म्हणजे दोन मुलांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगी सिरियस असताना तिचा मृत्यू झाला, तिला वाराणसीला उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. पण रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. गाझीपूरच्या सुहवाल पोलीस स्टेशन हद्दीतील भानमल राय पट्टीमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. सुनीता यादव असं आरोपी आईचं नाव आहे. तिने रागाच्या भरात स्वत: आपल्या मुलांना विष पाजलं.

Old Passbook: वडिलांच्या ६० वर्ष जून्या पासबुकने नशिब फळफळलं, एका रात्रीत मुलगा झाला करोडपती
सुनीताचे पती बालेश्वर यादवसोबत शुल्लक कारणावरून कौटुंबिक वाद झाला होता. यामुळे रागाच्या भरात तिने पोटत्या लेकरांना विष (एल्यूमीनियम फॉस्फाईड)दिलं. ज्यामध्ये दोन मुलं प्रियांशु (वय ८)-हिमांशु (वय १०)आणि मुलगी सुप्रिया यांचा समावेश आहे तर चौथा मुलाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Vinayak Mete: विनायक मेटे अपघात प्रकरणी ब्रेकिंग अपडेट, सुट्टीवर असलेल्या चालक वाघमारेंचा नवा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here