Authored by सचिन जिरे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 17, 2022, 2:31 PM
aurangabad crime news : औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पत्रकाराने महिलेचा गळा चिरून हत्या केल्याची संताजनक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

हायलाइट्स:
- प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या
- मृतदेह घेऊन जाताना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- औरंगाबादमधील धक्कादायक घटना
लग्नाचा तगादा लावल्याने रागाच्या भरात हत्या
प्राथमिक माहितीनुसार, सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण असून सौरभ हा विवाहित होता. मृत अंकिताने सौरभकडे लग्नाचा तगादा लावल्याने रागाच्या भरात त्याने महिलेचा गळा चिरून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर सौरभ याने महिलेचा मृतदेह गाडीतून घेऊन निघाला असताना देवगाव पोलिसांनी त्याला पकडले.
हत्या केल्याची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली
सौरभ हा पत्रकार असून स्थानिक दैनिकासाठी काम करतो. त्याने महिलेची हत्या केल्यानंतर मी हत्या केली असल्याची माहिती पत्रकार आमि पोलिसांच्या ग्रुपवर टाकली. त्यानंतर आपण देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात जमा होत असल्याची माहितीसुद्धा ग्रुपवर टाकली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network