तरुणीनं लग्न सोहळ्याचं आमंत्रण २ महिन्यांपूर्वीच ऑफिसमधल्या ७० जणांना दिलं होतं. मात्र यातील केवळ १ व्यक्ती लग्नाला पोहोचली. त्यामुळे लग्न सोहळ्यासाठी मागवण्यात आलेलं बरंचसं जेवण फेकून देण्याची वेळ आली.

तरुणीनं लग्न सोहळ्याचं आमंत्रण २ महिन्यांपूर्वीच ऑफिसमधल्या ७० जणांना दिलं होतं. मात्र यातील केवळ १ व्यक्ती लग्नाला पोहोचली. ही व्यक्ती त्या ऑफिसमध्ये तरुणीची ज्युनियर होती. ऑफिसमधून लग्नाला केवळ एकच व्यक्ती आल्यानं नातेवाईकांसमोर, कुटुंबासमोर वधूची अवस्था बिकट झाली. लग्न सोहळ्यासाठी मागवण्यात आलेलं बरंचसं जेवण फेकून देण्याची वेळ आली. यामुळे वधू चांगलीच संतापली आणि तिनं नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
आपल्याला न विचारताच वाढदिवसाची पार्टी ठेवल्यानं एका कर्मचाऱ्यानं ऑफिसकडून भरभक्कम रक्कम दंड मागितला होता. पार्टीमुळे कर्मचाऱ्याची अडचण होणार होती. मात्र तरीही पार्टी ठेवण्यात आल्यानं कर्मचारी संतापला आणि ऑफिसला दंड ठोठावला. त्यासाठी कर्मचारी न्यायालयाची पायरी चढला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.