नाझीर शाह (वय ४३) आणि छाया तुकाराम खिलारे (वय ४३) असं मृत्यू झालेल्यांचे नाव आहेत. सदर नवरा-बायको यांचा मृतदेह शताब्दी रुग्णालय येथे पाठवण्यात आला असून डंपर चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदर जोडपे मुंबईकडून मीरा रोडच्या दिशेने बाईकवरून चालले होते. यावेळी बोरीवली पश्चिम द्रुतगती मार्गावर संजय गांधी नॅशनल पार्कजवळ मागून येणाऱ्या एका एमएच ०२ इआर ५४६१ क्रमाकांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी नवरा-बायको डंपरच्या चाकाखाली आले आणि चिरडून त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती कस्तुरबा पोलिसांनी दिली आहे. अपघाताप्रकरणी डंपरचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, महामार्गावरील खड्ड्यांनी या जोडप्याचा बळी घेतल्याचा आरोप मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी केला आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बाईक पलटी झाली आणि मागून येणाऱ्या ट्रकखाली आल्याने नवरा-बायकोचा मृत्यू झाला, असं मनसेचे म्हणणे आहे. याप्रकरणी नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते कस्तुरबा पोलीस ठाण्यात जाऊन खड्डे भरणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यास पोलीस ठाण्याबाहेरच मनसे आंदोलन करणार असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितलं.
पश्चिम दृतीगती महामार्ग MSRDC अंतर्गत आहे. आता हे खड्डे किती जीव घेणार आहेत? असा सवाल करत MSRDC अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे.