Ajit Pawar Maharashtra assembly Session | मला मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे की, सोयाबीनचा प्रतिएकर खर्च ११७०० रुपये, तर कापसासाठी प्रतिएकर ११५०० रुपयांचा खर्च येतो. त्याच्यात नांगरणी, पाच मारणे, रासायनिक खतं, सारे काढणे, कीटकनाशक, मजुरी सगळ्याप्रकारचा खर्च मिळून कापूस आणि सोयाबीनसाठी प्रतिएकरी सरासरी ११५०० रुपयांचा खर्च येतो. पण राज्य सरकारने प्रतिहेक्टरी केवळ १३५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. एवढ्यात शेतकऱ्यांचे कसे भागणार, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

 

Ajit Pawar CM
अजित पवार आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • अजित पवार यांनी पीकविमा आणि पीककर्जाच्या मुद्दा उपस्थित केला
  • दादा भुसे कृषी खात्याचा कारभार खूप बारकाईने बघत होते
  • दादा भुसे कृषीमंत्री म्हणून खरंच चांगल्याप्रकारे काम करत होते
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना कृषीमंत्रीपद मिळाल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अजित पवार बऱ्यापैकी यशस्वी ठरले. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना चांगलेच कोंडीत पकडले होते. यावेळी त्यांनी कृषीमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अब्दुल सत्तार आणि दादा भुसे यांची चांगली फिरकी घेतली.
मंत्री तानाजी सावंत दुसऱ्याच दिवशी ‘क्लीन बोल्ड’; अजित पवारांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारताच तारांबळ
यावेळी अजित पवार यांनी पीकविमा आणि पीककर्जाच्या मुद्दा उपस्थित केला. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) साहेब आपल्याकडे कृषी मंत्रालय आले आहे. मी तर आश्चर्यचकितच झालो. दादा भुसे कृषी खात्याचा कारभार खूप बारकाईने बघत होते. पण त्यांच्यावर अन्याय का झाला, हे माहिती नाही. दादा भुसे कृषीमंत्री म्हणून खरंच चांगल्याप्रकारे काम करत होते. मी चांगल्या गोष्टीला चांगलच म्हणणार. पण आता राज्य सरकारने सोयाबीन आणि कापसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त १३५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. मला मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे की, सोयाबीनचा प्रतिएकर खर्च ११७०० रुपये, तर कापसासाठी प्रतिएकर ११५०० रुपयांचा खर्च येतो. त्याच्यात नांगरणी, पाच मारणे, रासायनिक खतं, सारे काढणे, कीटकनाशक, मजुरी सगळ्याप्रकारचा खर्च मिळून कापूस आणि सोयाबीनसाठी प्रतिएकरी सरासरी ११५०० रुपयांचा खर्च येतो. पण राज्य सरकारने प्रतिहेक्टरी केवळ १३५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. एवढ्यात शेतकऱ्यांचे कसे भागणार, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही; भाषणात अडथळा आणणाऱ्या नितेश राणेंना भास्कर जाधवांचा इंगा

माणसं मरतायत आणि दुसरीकडे दौरे सुरु, क्रेनने हार घालताय: अजित पवार

एकीकडे माणसं मरत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे दौरे सुरु आहेत, क्रेनने हार घातले जात आहेत. असे सत्कार न करता शांतपणे घ्या अशी सूचना देणं अपेक्षित होतं. शेतकरी संकटात असताना त्याच्या मागे उभा राहणं गरजेचे होते. यातूनच शेतकऱ्यांना बळ मिळते. २००३ च्या दुष्काळात आपल्याकडे पाऊस पडत नव्हता. तेव्हा कृत्रिम पावसाचाही प्रयत्न आम्ही केला. तुमचे लोक क्रेनने हार घालून घेतात, अजून शेतकरी अडचणीत आहे, हे वागणं बरं नाही, असे अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षाला सुनावले

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here