औरंगाबाद : जमिनीच्या जुन्या वादातून एका ५७ वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी पिसादेवी भगात घडली. जानार्धन कोंडीबा कसारे (वय ५७ रा. पिसादेवी, औरंगाबाद) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कासारे यांच्या ताब्यात सुमारे सात एकर जमीन आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून् ती जमीन करत आहेत. याच जमिनीवरून गावातील एका परिवारासोबत कासारे यांचा वाद होता. गेल्या १२ ते १३ वर्षांपासून हा वाद सुरु होता. यापूर्वी देखील हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. त्यातील एक प्रकरण न्यायालयात सुरु आहे. त्या प्रकरणाची येत्या आठ दिवसात सुनावणी होती. दोन्ही परिवारात अनेकदा वाद झाला.

दे दणादण… पहिल्याच सामन्यात भारताचा दणदणीत विजय, यजमान झिम्बाब्वेचे सपशेल लोटांगण…
आज कासारे हे शेतात काम करत असताना आरोपी तेथे आले. त्यांनी कासारे यांच्या सोबत वाद केला व त्यातील एकाने धारदार कुऱ्हाडीने कासारे यांच्या डोक्यावर वार केला. डोक्याला जबर मार लागल्याने कासारे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. त्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले. बायको आणी मुलाने जखमी अवस्थेत कासारे यांना रुग्णालयात नेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय घाटी रुग्णाल्यात धाव घेतली होती. त्यामुळे घाटीत मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Raju Srivastava Health: राजू श्रीवास्तव ब्रेन डेड, हृदयही करत नाही काम; डॉक्टरांनी कुटुंबियांना दिलं उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here