Maharashtra Assembly Session | काल रात्रीपासून शिवसेनेच्या कोकणातील तीन आमदारांपैकी एकजण शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. यामध्ये भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक यांचा समावेश होता. हे तिन्ही नेते मातोश्रीच्या जवळचे आहेत. त्यामुळे यापैकी कोण आणि का शिंदे गटाच्या गळाला लागले, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

हायलाइट्स:
- कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी हे अनुकूल
- अंतर्गत कलहामुळे राजन साळवी शिंदे गटात सामील होणार
- शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी राजन साळवी हे सगळ्यात ज्येष्ठ आमदार
काल रात्रीपासून शिवसेनेच्या कोकणातील तीन आमदारांपैकी एकजण शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. यामध्ये भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक यांचा समावेश होता. हे तिन्ही नेते मातोश्रीच्या जवळचे आहेत. त्यामुळे यापैकी कोण आणि का शिंदे गटाच्या गळाला लागले, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आता राजन साळवी यांचे नाव पुढे आले आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी हे अनुकूल आहेत तर खासदार विनायक राऊत हे कायम प्रकल्पविरोधी मत मांडत आले आहेत. या अंतर्गत कलहामुळे राजन साळवी शिंदे गटात सामील होणार असल्याचे सांगितले जाते.
दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलं. तसेच कोकणात उद्योग आल्यास येथील बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल, रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे आपण या रिफायनरी बाबत ज्यांचे गैरसमज असतील ते दूर करू अशी भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी आमदार राजन साळवी यांचीही आपण लवकरच भेट घेऊन चर्चा करू असे जाहीरपणे सांगितले होते. हाच मुद्दा राजन साळवी यांच्याबाबतीच निर्णायक ठरल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांना सध्या राज्यभरातून १५ सेना आमदारांचं पाठबळ आहे. राजन साळवी शिंदे गटात गेल्यास शिवसेनेकडे फक्त १४ आमदारच शिल्लक राहतील.
कोण आहेत राजन साळवी?
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी राजन साळवी हे सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहेत. साळवी यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांचा पराभव करून ते निवडून आले होते. राजन साळवी यांनी रत्नागिरी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगराध्यक्ष तसंच शिवसेना जिल्हाप्रमुखपदावरही काम केलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असले तरी राजन साळवी यांनी मंत्रिमंडळात काम करण्यासाठी एकदाही संधी मिळालेली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत आली. मात्र निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांच्यामुळे साळवी यांचे मंत्रिपद हुकले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.