अक्कलकोट येथे असलेल्या कर्नाटक सीमेवरील हिरोळी गावात मोठा अनर्थ टळला आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या दोन अल्पवयीन लेकरांना विहिरीत टाकलं आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 

solapur women throws child in well
महिलेचा दोन लेकरांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न
सोलापूर: अक्कलकोट येथे असलेल्या कर्नाटक सीमेवरील हिरोळी गावात मोठा अनर्थ टळला आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या दोन अल्पवयीन लेकरांना विहिरीत टाकलं आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण गावातील बसवराज या युवकाने ऐनवेळी घटनास्थळी येऊन तिघांना वाचवले आहे. त्यामुळे दुर्दैवी घटना टळली.

हिरोळी (ता.अक्कलकोट जि सोलापूर) येथील महिलेने कौटुंबिक वादातून शुक्रवारी दुपारी टोकाचे पाऊल उचलले. तिने घराजवळ असलेल्या एका विहिरीत आपल्या मोठ्या मुलीला आणि छोट्या मुलाला विहिरीत टाकले आणि स्वतः ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील बसवराज या तरुणाची नजर विहिरीकडे गेली. त्याने ताबडतोब स्वतःच्या जीवाची परवा न करता, काही क्षणांतच विहिरीत उडी टाकली. बसवराजने आधी दोन्ही मुलांमा बाहेर काढले आणि काही वेळेतच महिलेचाही जीव वाचवला.
माझ्या जीवावर मजा मारली, केस स्ट्रेटनिंग केले! प्रेयसीमुळे कर्जबाजारी तरुणाचं टोकाचं पाऊल
गावातील इतर रहिवाशांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत दोन्ही लेकरांना बाजूला केले. कन्नड भाषेत महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हिरोळी गाव अक्कलकोट(महाराष्ट्र) आणि गुलबर्गा(कर्नाटक) सीमेवर आहे. याबाबत अक्कलकोट दक्षिण सोलापूर पोलीस ठाणे येथे नोंद नसल्याची माहिती मिळाली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here