रत्नागिरीः जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज बुधवारपासून नवीन आदेश जिल्ह्यात जारी केला आहे. या आदेशा प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी राहणार आहे. अत्यावश्यक सेवा देणारे तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना यामधून मुभा देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जर कोणी यामध्ये अनावश्यक बाहेर फिरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याआधीच्या आदेशाप्रमाणे केशकर्तनालय, सलून, स्पा यांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र नवीन आदेशाप्रमाणे आता ही दुकाने सुरू राहणार नाहीत. तसेच पूर्वी अंत्यविधीसाठी ५० लोकांना परवानगी देण्यात आली होती मात्र आता फक्त 20 लोकांना अंत्यविधीसाठी सहभागी होता येणार नाही. तसेच शाळा कॉलेज विद्यापीठ यातील कर्मचारी फक्त अशैक्षणिक कामा साठीच जाऊ शकतात.

व्यापारी दुकाने ही पूर्वी प्रमाणेच वेळेनुसार सुरु होतील व पूर्वी प्रमाणे दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ९ पर्यंतच सुरू राहणार आहेत. इतर आदेश पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत असे जिल्हा प्रशासना कडून सांगण्यात आले आहे.

रत्नागिरीत १९८ करोना रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात मिरजयेथून प्राप्त झालेल्या संशयित करोना रुग्णांच्या अहवालांपैकी १३ अहवाल पॉझिटिव आले आहेत. यातील एका रुग्णाचा काल मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३४ इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांपैकी गुहागरमध्ये २, कळंबणी येथे ४, कामथे येथे ३, रत्नागिरी येथे १ व संगमेश्वर येथील ३ रुग्णांचा यात समावेश आहे. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १९८ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज ४ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.आत्तापर्यंत एकूण १२५ जणांनी करोनावर यशस्वी केली आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here