ठाणे : महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारमधून बंड पुकरल्यानंतर ठाण्यातील हजारो शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समर्थन देत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेला भलेमोठे खिंडार पडलेले पाहायला मिळाले. या चढाओढीत शिंदे गटाने संपूर्ण ठाण्याचा ताबा घेतला. आनंद मठ देखील शिंदे गटाच्या ताब्यात होते. तरीही काही ठाकरे समर्थक एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोध ठाम राहून ठाकरे सरकारच्या बाजूने उभे होते. मात्र या घटनेनंतर ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चढाओढ सुरू झाल्याचे दिसून आले. या चढाओढीत धर्मवीर आनंद दिघे यांचे दोन शिष्य, एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे खासदार राजन विचारे आमने- सामने होते.

या संपूर्ण घटनेनंतर ठाण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा एकही बडा नेता ठाण्यात आला नव्हता. मात्र दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यातील राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महादहीहंडीला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नुसती उपस्थिती न दर्शवता ठाण्यात पोहचताच आदित्य ठाकरे हे गाडीतून उतरून पदयात्रा करत थेट धर्मवीर आनंद दिघे यांच्या निवासस्थानी म्हणजेच आनंद मठ या ठिकाणी पोहचले. या आनंद मठात जाऊन आदित्य ठाकरे यांनी हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत आदरंजली वाहिली. प्रतिमेला नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतल्यानंतर आदित्य ठाकरे हे राजन विचारे यांच्या हंडिला उपस्थित झाले. आणि त्यांच्याच उपस्थितीत आनंद चॅरिटेबल ट्रस्टची मानाची हंडी फोडून या गोपाळकाल्याची सांगता करण्यात आली.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. आनंद या गोष्टीचा आहे की सगळीकडे चांगला जोश आणि उत्साह दिसून येत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ५० थर लावून हंडी फोडण्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यावरही आदित्य ठाकरे बोलले. त्यात मलाई कोणी खाल्ली हे पाहणं गरजेचं असणार आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

aditya thackeray thane

शिवसेना नेते आदित्य ठाकेर ठाण्यात आनंद मठात

आज राजकीय भाष्य करणे हे काही मला योग्य वाटत नाही आणि आज आम्ही राजकारणावर बोलणार नाही. आमचे सारे धर्म आणि राजकारण हे वेगळं आहे. हा आमचा एक धार्मिक सण आहे. नागरिकांना असो किंवा कार्यकर्त्यांना असो, आनंद घेण्याचा सण आहे आणि यात कुठलाही राजकारण आणणं मला योग्य वाटत नाही. काही लोकांना उठता, बसता, झोपता राजकारण आठवत असतं. पण आम्ही राजकारण २४ तास करत नाही. आम्ही लोकांची सेवा करतो. सेवेतूनच लोकांना आनंद देण्याचा क्षण निर्माण करून दिलेला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

रात्री साडेअकरा वाजता खाडी पार करत मुख्यमंत्री डोंबिवलीत; असं काय बोलले? कार्यकर्ते झाले भावुक

नेहमी आम्ही जेव्हा येतो तेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जात असतो. अर्थात एक वेगळ्या भावनेने तिथे जात असतो. तिथे देखील कधी राजकारण आम्ही आणलं नाही आणि स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाचे फोटो आम्ही जास्त किंवा कमी केले नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही आदित्य बोलले. स्वतःच्या स्वार्थासाठी जे गेलेले असतील ते गोल पोस्ट बदलत आहेत, असं म्हणत पण आज राजकारण नको ते आदित्य म्हणाले. आनंद दिघे यांचे स्वप्न होतं की ठाण्याचा मुख्यमंत्री बनावं? असं बोललं जातंय. यावरही आदित्य यांनी उत्तर दिलं. कोणी काहीही बोलू शकतो. त्याच्यात सत्य काय आहे. हे लोकांना माहिती आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आजच्या क्षणी राजकारणावर बोलणं हे मेचोरिटीचे चिन्ह नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

थरामुळे नाही तर मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी राज्यभरात चर्चेत, बघा काय आहे कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here