काय म्हणाले आदित्य ठाकरे?
दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. आनंद या गोष्टीचा आहे की सगळीकडे चांगला जोश आणि उत्साह दिसून येत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ५० थर लावून हंडी फोडण्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यावरही आदित्य ठाकरे बोलले. त्यात मलाई कोणी खाल्ली हे पाहणं गरजेचं असणार आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

शिवसेना नेते आदित्य ठाकेर ठाण्यात आनंद मठात
आज राजकीय भाष्य करणे हे काही मला योग्य वाटत नाही आणि आज आम्ही राजकारणावर बोलणार नाही. आमचे सारे धर्म आणि राजकारण हे वेगळं आहे. हा आमचा एक धार्मिक सण आहे. नागरिकांना असो किंवा कार्यकर्त्यांना असो, आनंद घेण्याचा सण आहे आणि यात कुठलाही राजकारण आणणं मला योग्य वाटत नाही. काही लोकांना उठता, बसता, झोपता राजकारण आठवत असतं. पण आम्ही राजकारण २४ तास करत नाही. आम्ही लोकांची सेवा करतो. सेवेतूनच लोकांना आनंद देण्याचा क्षण निर्माण करून दिलेला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
रात्री साडेअकरा वाजता खाडी पार करत मुख्यमंत्री डोंबिवलीत; असं काय बोलले? कार्यकर्ते झाले भावुक
नेहमी आम्ही जेव्हा येतो तेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जात असतो. अर्थात एक वेगळ्या भावनेने तिथे जात असतो. तिथे देखील कधी राजकारण आम्ही आणलं नाही आणि स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाचे फोटो आम्ही जास्त किंवा कमी केले नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही आदित्य बोलले. स्वतःच्या स्वार्थासाठी जे गेलेले असतील ते गोल पोस्ट बदलत आहेत, असं म्हणत पण आज राजकारण नको ते आदित्य म्हणाले. आनंद दिघे यांचे स्वप्न होतं की ठाण्याचा मुख्यमंत्री बनावं? असं बोललं जातंय. यावरही आदित्य यांनी उत्तर दिलं. कोणी काहीही बोलू शकतो. त्याच्यात सत्य काय आहे. हे लोकांना माहिती आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आजच्या क्षणी राजकारणावर बोलणं हे मेचोरिटीचे चिन्ह नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
थरामुळे नाही तर मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी राज्यभरात चर्चेत, बघा काय आहे कारण…