गुरुवारी अडचणीत आलेल्या तानाजी सावंतांनी आज दिलं सविस्तर उत्तर
पालघर जिल्ह्यात एकूण आरोग्य विभागाची मंजूर आणि रिक्त, भरलेली पदे किती याची माहिती अजित पवार यांनी गुरुवारी विचारली होती. ऐनवेळी विचारलेल्या या प्रश्नामुळे मंत्री तानाजी सावंत यांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर हा प्रश्न राखीव ठेवण्यात आला. याची माहिती तानाजी सावंत यांनी आज आकडेवारीसह सादर केली. ‘पालघरमध्ये ६९ मंजूर पदे, भरलेली ३८, रिक्त पदे ३१ आहेत. अतिरिक्त भार देऊन कामकाज सुरूच आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राज्य सरकार यांच्यात ६०:४० असं खर्चाचं प्रमाण आहे, वेळेत निधी उपलब्ध करुन दिला जातोय,’ असं सावंत म्हणाले.
bjp mangal prabhat lodha news, ‘ मी नवीन प्लेअर…जरा दमानं घ्या’; विरोधकांच्या आक्रमक हल्ल्याने सरकारमधील आणखी एक मंत्री घायाळ – maharashtra monsoon session bjp leader and minister mangal prabhat lodha on the backfoot after a question asked by a congress mla
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला आणि थेट पावसाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे आपल्या खात्याची सखोल माहिती घेण्यास या मंत्र्यांना वेळ मिळाला नाही. परिणामी आता सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना नवनिर्वाचित मंत्र्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबाबतही सभागृहात आज काहीसा असाच प्रकार घडला.