Gram Panchayat Election, घोडेबाजार, वाद टाळण्यासाठी या गावाने लढवली अफलातून शक्कल; सरपंचपदाबाबत तयार केला नवा पॅटर्न – all members will get a chance to become sarpanch in a village in ambernath
अंबरनाथ : अंबरनाथच्या ढोके दापिवली ग्रामपंचायतीत सात महिन्यांच्या सरपंचपदाचा अनोखा पॅटर्न राबवला जातोय. सरपंचपदाच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार टाळता यावा, तसंच प्रत्येक सदस्याला सरपंचपदी काम करण्याची संधी मिळावी, यासाठी राबवण्यात आलेल्या या अनोख्या पॅटर्नचं सध्या जिल्ह्यात कौतुक होतंय. (All members will get a chance to become Sarpanch in a village in Ambernath)
ग्रामपंचायत सदस्य आणि त्यातही सरपंचपदाला ग्रामीण भागात मोठा मान असतो. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच मोठी चुरस पाहायला मिळते. तर, सरपंचपदाची निवडणूक ही मोठी प्रतिष्ठेची बनलेली असते. यात अनेकदा घोडेबाजार, वादविवाद होऊन गावातलं वातावरण दूषित होतं. मात्र हे सगळं टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापिवली आंबेशिव खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीनं एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांना प्रत्येकी ७ महिने सरपंचपद दिलं जातंय. ज्यामुळे सर्वांना या पदावर काम करण्याची, गावचा कारभार हाताळण्याची संधी मिळतेय. काळ्या जादूसाठी ७० लाखांच्या मांडुळाची विक्री, कल्याणमध्ये पोलिसांची धडक कारवाई मागील १४ महिन्यात या ग्रामपंचायतीत तिसऱ्या सरपंच आणि उपसरपंचाची निवड नुकतीच करण्यात आली. या ग्रामपंचायतीत माधुरी रामदास भोईर, नितीन बाळकृष्ण गायकर, जागृती अमोल भोईर, योगेश भालचंद्र भोईर, पूजा सचिन गायकर, रतन रमेश भोपी, श्रीधर बाळाराम भोपी, नीता बळीराम भोपी आणि सरिता गणेश सवार असे एकूण ९ सदस्य आहेत. यापैकी जागृती अमोल भोईर आणि योगेश भालचंद्र भोईर हे २ सदस्य यापूर्वी ७-७ महिने सरपंच होऊन गेले आहेत. तर आता माधुरी रामदास भोईर या सरपंच आणि नितीन बाळकृष्ण गायकर हे उपसरपंच बनले आहेत. पुढील ७ महिने त्यांचा कार्यकाळ असेल, आणि त्यानंतर पुन्हा नव्या सदस्यांची निवड केली जाईल.
मद्यपी तरुणाने फोडली दहीहंडी; ५५ हजारांच्या बक्षिसासह खेळाडू आरक्षणातून नोकरीची मागणी! देशात पंचायत बराज कायद्याने ग्रामपंचायतींचं महत्त्व दाखवून दिलं आहे. त्यात देशात सर्वाधिक मतदान देखील ग्रामपंचायत निवडणुकीतच होतं, हेदेखील समोर आलं आहे. त्यामुळे निवडणुकीत होणारी चुरस, राजकीय स्पर्धा आणि वादविवाद टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ढोके दापिवलीचा हा पॅटर्न सगळीकडेच राबवायला हरकत नाही.