Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 24, 2022, 3:59 PM
Ashram School : इगतपुरी येथील आश्रम शाळेत विषबाधा झाल्याने दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.

हायलाइट्स:
- आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा
- दोन विद्यार्थ्यांचा मृत्यूो
- नाशकातील इगतपुरी येथील धक्कादायक प्रकार
काल मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण केल्यावर आज बुधवारी पहाटेच्या सुमारास ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. इगतपुरी शहरात मतिमंद मुलांची शाळा असून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी शाळेतील निवासी मतिमंद मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना इगतपुरी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network