मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टानं २३ ऑगस्टला घेतलेल्या सुनावणीत २५ ऑगस्टला सुनावणी घेण्यात येईल, असं म्हटलं होतं. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी आज सुनावणी घेण्यात येईल, असं म्हटलं होतं. मात्र, आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी झाली नाही. आता राज्यातील सत्तासंघर्ष पुढच्या १० दिवसांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ४ सप्टेंबर पर्यंत लांबणीवर पडल्याचं समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर २ सप्टेंबरपर्यंतच्या सुनावणीला येणाऱ्या प्रकरणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ३ आणि ४ सप्टेंबरला शनिवार आणि रविवार असल्यानं तोपर्यंत ही सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

सुप्रीम कोर्टानं २३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी घेतली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सोपवण्याचा निर्णय घेतला आणि २५ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आज देखील सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी झाली नाही.

यूट्यूब चॅनल ते QR कोड, गेवराईतील टेक्नॉसॅव्ही कुलथे गुरुजींना राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा उद्या निवृत्त होत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी आता नव्या सरन्यायाधीशांपुढं होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती यू.यू. ललित हे भारताचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी करणाऱ्या घटनापीठाची निर्मीती देखील नवे सरन्यायाधीश करण्याची शक्यता आहे.

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, दोघा सहकाऱ्यांना हत्येच्या गुन्ह्याखाली अटक

ठाकरे गटापुढं पर्याय काय?

सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरील ३२ पानांच्या यादीनुसार २ सप्टेंबरपर्यंतच्या कामकाजामध्ये महाराष्ट्रातील याचिकांचा समावेश करण्यात आलेला नाही. घटनापीठात कोणते पाच न्यायमूर्ती असतील याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या गटाला सुनावणी तातडीनं व्हावं असं वाटत असल्यासं त्यांच्यापुढे न्यायालयाला विनंती करण्याचा पर्याय शिल्लक आहे. ठाकरे गटाच्या वकिलांनी विनंती केल्यास सुप्रीम कोर्ट महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी लवकर घेण्याबाबत विचार करु शकतं.

एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंच्या फोनचा ‘तो’ किस्सा, अजित पवारांनीही हात जोडले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here