Maharashtra Rain News Today : राज्यात गणेशोत्सवाची धूम असताना आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशात आता हवामान खात्याकडून मान्सूनसंबंधी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. यंदा पाऊस लवकर ब्रेक घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

 

maharashtra weather forecast
मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून धुवांधार पाऊस झाला आहे. अशात आता मान्सूनसंबंधी हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा १५ दिवस आधीच पाऊस निरोप घेण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम असताना आता मुंबई हवामान केंद्राने (mumbai weather forecast) महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यामुळे शेतीच्या कामांना आणखी वेग आला आहे. राज्यात तसं पाहायला गेलं तर समाधानकारक पाऊस झाला. यंदा झालेल्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत तर अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती ओढावल्याचं चित्र आहे.

विकृतीचा कळस! रक्षाबंधनासाठी आलेल्या बहि‍णीवर चुलत भावांकडून बलात्कार; प्रतिकार करणाऱ्या आजीलाही…
एकंदरीत मान्सूनचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरपासून सुरू होतो आणि ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. पण यंदा मान्सून लवकर जाणार आहे. बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम पाऊस-पाण्यावर होत असतो. त्यामुळे आता पावसाचे स्वरुपही बदलले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तुफान पावसामुळे धरणांमध्ये चांगला पाणीसाठी जमा झाला आहे.

महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई, टीप मिळताच घरात टाकला छापा; सापडलं मोठं घबाड

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here