बागपतमध्ये दिल्ली यमुनोत्री हायवेवर सावत्र आई आणि सीताने रागाने तिच्या २ वर्षीय मुलाला रस्त्यावर फेकले. तेव्हा वेगाने येणाऱ्या कारने मुलाला धडक दिली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. सूचना मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर मुलाचा मृतदेह वडिलांकडे सोपवला. परंतु रूग्णालयाने मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनही उपलब्ध करून दिले नाही.
त्यामुळे मृतदेह हातात घेऊन भाऊ आणि वडील घराच्या दिशेने निघाले. मुलाचा मृतदेह त्याचा भाऊ आणि वडील रस्त्यात एकमेकांकडे देत राहिले. खूप वेळ मृतदेह पकडून वडील थकल्यानंतर भावाच्या हाती मृतदेह सोपवला. तर भाऊ थकल्यानंतर वडिलांकडे मृतदेह द्यायचा. वडिलांकडे इतकेही पैसे नव्हते जेणेकरून खासगी रूग्णवाहिका येऊ शकेल.