चिपळूण : पक्षातील फुटीनंतर अडचणीत सापडेलल्या शिवसेनेनं आता उभारी घेण्यासाठी नवे मार्ग आजमावून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने आम्ही संभाजी ब्रिगेडसोबत युती करत असल्याची घोषणा नुकतीच शिवसेना नेतृत्वाकडून करण्यात आली. शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती करताच भाजपने टीका करत खिल्ली उडवली. ही युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, असं भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. या टीकेला आता शिवसेनेतून आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे.
‘भाजपने आजवर दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम, रासपचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांच्यासोबत युती केली. मात्र आज या सगळ्यांची अवस्था काय झाली हे आपण बघताय. शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की जो मैत्री करतो व त्याला जागतो. संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देतो,’ असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. सत्तेची फळे चाखली कुणी? राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडलं
दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाला इशारा
दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. मात्र यंदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला झालेल्या शिंदे गटाने हा मेळावा हायजॅक करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगत आहे. यावर उत्तर देताना भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे की, ‘शिवसेनेच्या नादाला लागाल तर भस्मसात व्हाल. शिवसेना हा जुना पक्ष असुन तो हिंदुत्वाचा अंगार आहे, निखारा आहे. शिवसेनेच्या नादाला लागू नका, अन्यथा राजकीय कारकीर्द भस्मसात होईल. दसरा मेळावा हा इतिहास, परंपरा आहे. ती कोणीही रोखण्याचा प्रयत्न करू नका,’ असा इशारा दसरा मेळाव्याबाबत बोलताना भास्कर जाधव यांनी दिला आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times