जळगाव: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून स्वपक्षाचा फायदा करून घेण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) यासाठी खास रणनीती आखली आहे. शिवसेना (Shivsena) सोडल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात बंडखोर आमदारांविषयी काहीशी नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. याचाच फायदा उठवत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात रान उठवण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. (Jayant Patil address NCP workers in Jalgaon)

पक्षांतर करणे लोकांना आवडत नाही, त्यातच काही ‘आमिष’ घेऊन गेले असतील तर जनतेला ते अजिबात पसंत पडत नाही, त्याविरुद्ध जनतेत चीड निर्माण होते. त्यामुळे शिवसेनेतून पक्षांतर करून काही आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांनी पक्षांतर कशासाठी केले आहे, त्याचीही सुरु चर्चा आहे. हाच मुद्दा धरुन बंडखोर आमदारांविरोधात रान उठवा. जनतेच्या मनात पक्षांतराबद्दल जागृती निर्माण करा. यामुळे जनतेत त्यांच्याविरुद्ध रोष निर्माण होईल व जनता त्यांना स्वीकारणार नाही. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी या गोष्टीचा फायदा होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
Maharashtra Monsoon Session: आज साईड चेंज केली! जयंत पाटलांकडून शिंदेंची मिमिक्री; मुख्यमंत्री खळखळून हसले

‘५० खोके, एकदम ओके’चा ‘टी शर्ट’द्वारे प्रचाराचा निर्णय

प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत जळगावात पक्षाची आढावा बैठक झाली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. राज्याच्या राजकारणात ‘५० खोके, एकदम ओके’ या सत्ताधाऱ्यांविरोधातील महाविकास आघाडीच्या घोषणेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता याच घोषणेचे ‘टी शर्ट’ वाटून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून प्रचार करण्यात येणार आहे.
आम्हाला वाटायचं फडणवीस सांगतात ते मोदी ऐकतात पण आता…, जयंतरावांच्या फटकेबाजीने फडणवीस घायाळ
‘…तर उद्धव ठाकरे म्हणतील, ही आमची सीट, आम्हाला जागा द्या’

आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. यासाठी आपल्याला प्रत्येक तालुक्यात सभासद संख्या अधिक करावी लागणार आहे, जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सभासद संख्या अधिक असली, तर आपल्याला त्याठिकाणची जागा मागता येणार नाही, यासाठी राष्ट्रवादीची ताकद दाखवावी लागेल, याची जाणीव जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here