ASIA CUP 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. हा सामने कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. पण या सामन्याचा टर्निंग पॉइंट काय छठराल, हे आता समोर आले आहे. ही गोष्ट घडली ती १८ व्या षटकात. यावेळी पाकिस्तानचा संघ गोलंदाजी करत होता. १८ व्या षटकात्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट घडली. त्यावेळी भारताचा रवींद्र जडेजा हा दमदार फलंदाजी करत होता.

जडेजा हा सामन्यात महत्वाचा ठरला. कारण रोहित आणि कोहली बाद झाल्यावर काही काळ रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांनी थोडाफार प्रतिकार केला खरा, पण सूर्यकुमार यावेळी १८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने आक्रमक सुरुवात केली. त्याला जडेजाही चांगली साथ देत होता. जडेजाने त्यानंतर धडाकेबाज फटेकबाजी करायला सुरुवात केली आणि पाकिस्तानच्या गोलंदजांचा चांगलाच समाचार घेतला. जडेजाने यावेळी पहिल्यांदा भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. त्यामुळे जडेजाने घेतलेला रीव्ह्यू या सामन्यात सर्वात महत्वाचा ठरला. त्यामुळे अठराव्या षटकातील रीव्ह्यूमुळे हा सामना फिरल्याचे पाहायला मिळाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.