Shivsena vs Eknath Shinde | शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आग्रह धरला जात आहे. मात्र, ४ ऑगस्टनंतर या प्रकरणाची सुनावणी झालेली नाही. अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे

हायलाइट्स:
- शेवटची सुनावणी ही ४ ऑगस्ट रोजी झाली होती
- त्यानंतर ‘तारीख पे तारीख’ असा प्रकार सुरु आहे
- शिवसेनेच्या गोटातील बैचेनी अगोदरच वाढली आहे
भरत गोगावले यांनी रविवारी एका सभेत याबद्दल वक्तव्य केले. अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. पण तुम्हाला मी सांगतो की, आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. हे आता जवळजवळ चार ते पाच वर्षे चालणार आहे. दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, असे भरत गोगावले यांनी म्हटले. राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
सर्वोच्च न्यायालय शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवत नाही तोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार हे सुरळीत चालू राहील. शिंदे-फडणवीस यांच्याकडे सत्ता कायम राहिल्यास आगामी काळात शिवसेनेची आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आपले वकील कपिल सिब्बल यांच्यामार्फत लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आग्रह धरला जात आहे. या प्रकरणात अनेक घटनात्मक पेच आहेत. त्याचा निवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. आता हे घटनापीठ कधी सुनावणी घेणार आणि काय निकाल देणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंनी वाचवला: गुलाबराव पाटील
दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेतेपदी बढती दिलेल्या भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाला इशारा दिला होता. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असून राजकीय अधिकारात कोणी हात टाकल्यास त्याचा राजकीय प्रवास भस्मसात होईल, असं जाधव म्हणाले होते, त्यावर आता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना कोणाची आहे, यापेक्षा शिवसेना वाचवली कोणी, हे सर्वात महत्त्वाचे आहे. शिवसेना वाचवण्यासाठी सर्वात मोठे काम कोणी केले असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.