अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाच्या नगरसेविका सपना ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जयंत पाटील विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती दौऱ्यात त्यांनी सपना ठाकूर यांचं राष्ट्रवादीत स्वागत केलं. संघटनात्मक आढावा दौऱ्याच्या निमित्ताने पाटील राज्यातले विभाग पिंजून काढत आहेत. अमरावतीत राष्ट्रवादीची फारशी ताकद नसल्याने तिथे ताकद वाढवणं हे आपल्यासमोरचं आव्हान असल्याचं सांगत बेरजेच्या राजकारणाची आवश्यकता असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी संघटनात्मक आढावा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यानंतर अमरावती शहर व ग्रामीण कार्यकारिणीची बैठक घेतली. “अमरावती शहरात सर्व काही असतानाही येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक कमी निवडून येतात याबाबत मला प्रचंड खंत वाटते. मात्र शहराची सध्याची परिस्थिती पाहता पुढच्या काळात या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल” असा विश्वास पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.

आपल्या जिल्ह्याला विचारांचा मोठा वारसा आहे, या जिल्ह्याने आपल्या विवेकाचा वापर करून अनेकदा चांगल्या लोकांना संधी दिली आहे. येणाऱ्या काळातही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण वर आणण्याचा प्रयत्न करू. सध्या राज्यभरात सभासदांची नोंदणी केली जात आहे. जिल्ह्यात जास्तीतजास्त सभासदाची नोंद होईल याची खबरदारी घ्या. सर्व पक्षांपेक्षा जास्त सभासद आपल्या पक्षाचे असले पाहिजे. पक्षाच्या शिस्तेचे पालन प्रत्येकाने करायला पाहिजे. मला हे सत्कार, हारतुरे, फेटे यात काहीच रस नाही. आपली पार्टी वाढण्यात मला रस आहे. आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

ठरलं…. कुठल्याही परिस्थितीत संतोष बांगरांना अस्मान दाखवायचं, उद्धव ठाकरेंची मोठी खेळी!
पुढे ते म्हणाले, “राजकारणात वेळ फार महत्त्वाचा, लोक राजकारणात आयुष्य घालवतात त्यामुळे वेळेचा उपयोग करून पक्षाच्या आणि आपल्या प्रगतीचा विचार आपण करायला हवा. लोकांना विषय समजून सांगा तरच लोकांचे प्रबोधन होईल आणि एक जन आंदोलन उभे राहील. येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकायला हवा यासाठी प्रयत्न करा. आपल्यात अचूक नियोजन पाहिजे, एकसंधपणा पाहिजे तर आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही”

बिल्किस बानो, गुजरात आणि पंतप्रधान मोदींचं भाषण, शरद पवारांनी धू धू धुतलं!
“संजय खोडके यांनी या शहरात चांगल्याप्रकारे पक्ष बांधला आहे. लोकांसोबत संपर्क ठेवणे फार महत्त्वाचे आहे. लोकांसाठी सदैव उपलब्ध राहिले पाहिजे. संजय खोडके हे आपल्या बाईकवर फिरत असताना लोकांशी संवाद साधतात, त्यांच्या अडचणी असतील तर ते सोडवतात”, अशा शब्दात जयंत पाटील यांनी संजय खोडके यांच्या कामाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here