परभणी : तुझ्या आई-वडिलांनी आम्हाला मान दिला नाही, अथवा कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे सोन्याच्यांदीच्या दागिन्यांसह पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळीने एका २७ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याची घटना परभणी शहरातील महेंद्र नगर येथे घडली आहे. याप्रकरणी नानालपेठ पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

निशा विपीन टाक (वय २७) यांचा विवाह २०२० साली विपीन अशोकराव टाक यांच्याशी दोन्ही कुटुंबाच्या संमतीने झाला होता. विवाहामध्ये निशाच्या वडिलांनी हुंडा म्हणून २ लाख ५० हजार रुपये व संसारोपयोगी साहित्य असा खर्च केला. विवाहानंतर निशा महेंद्र नगर येथे नांदायला गेले. सुरुवातीचे काही चांगले दिवस नांदवले आणि त्यानंतर १५ सप्टेंबर २०२० विपीन व सासरची मंडळी यांनी छोटया छोटया गोष्टीवरून मानसिक, शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली.

उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीचं काम मिळालं, शिवसेनेची बोचरी टीका
“नवीन घर बांधकामासाठी आई वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये” असं म्हणत पती, सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करत चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी पती विपीनने अचानक येऊन निशाला सांगितले की, “तुझ्यासोबत मला राहायचे नाही. घटस्फोट घ्यायचा आहे”, असं म्हणत कोर्टात घेऊन गेला आणि तेथे निशा यांना सोडून निघून गेला. तेव्हापासून विवाहित निशा माहेरीच राहते.

दरम्यान, १६ जून २०२२ रोजी अंदाजे रात्री नऊ वाजता निशा सासरी गेली असता तेव्हा पतीने अमानुष मारहाण केली, गळा दाबून मारून टाकतो म्हणून मला पकडले होते. या प्रकरणी विवाहितेने नानालपेठ पोलीस ठाण्यात पती विपीन अशोकराव टाक, सासू पुष्पा अशोक टाक, सासरे अशोकराव माणिकराव टाक, सचिन अशोकराव टाक, सानिका सचीन टाक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील तुम्ही असं कसं वागू शकता? तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न आणि पाटलांनी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here