Yavatmal Farmer Suicide: शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्यानंतरही दुष्काळाची झळ सोसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र कमी होताना दिसत नाही.

आणखी एकाने जीवन संपविले
मारेगाव तालुक्यातील शिवणी येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. हरिदास सूर्यभान टोनपे (वय ४८) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती होती. यावर्षी त्यांनी कापूस व तुरीची पेरणी केली होती. पण अतिवृष्टीने व पुरामुळे त्यांचे शेत खरडून निघाले. त्यामुळे पुन्हा पीक घेणे शक्य नसल्याने कुटुंबाचा खर्च कसा करावा या काळजीत ते होते. त्यांच्यावर बँकेचे व खाजगी कर्ज होते. मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी शेतात कामाला गेली होती. मुले शाळेत गेले होते. हरिदास घरी एकटेच होते. त्यांनी कीटकनाशक प्यायले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.