कोल्हापूर : नव्या सरकारने उत्सवावरील बहुतांशी निर्बंध उठवल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात होत असताना अजूनही अनेक गावांनी पुरोगामी चळवळीचा आदर्श कायम ठेवला आहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण महाराष्ट्रातील तब्बल १०८० गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दरम्यान, करोना संसर्गामुळे गतवर्षी हा उत्सवच न करण्याचा निर्णय अनेक गाव आणि सार्वजनिक मंडळांनी घेतला होता, यंदा मात्र करोनाची भीती कमी झाल्याने अशा गावांची संख्या फारच कमी झाली आहे.

राज्यावर दोन वर्ष करोना संसर्गाचे मोठे संकट होते. देशात महाराष्ट्राची आकडेवारी मोठी होती. दक्षिण महाराष्ट्रातही पाच लाखावर लोकांना त्याचा फटका बसला. या भागातील कोल्हापूर, सांगली व सातारा या तीनही जिल्ह्यांना दोन वर्षे महापुराचाही तडाखा बसला. या पार्श्वभूमीवर दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. गतवर्षी तब्बल ६४ गावांना उत्सवाला फाटा देत जमा झालेली रक्कम विधायक कामाला वापरले.

अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का? पक्ष सोडणार का? आझादांची भेट का? थेट प्रश्नांना पृथ्वीराजबाबांची रोखठोक उत्तरं

यंदा मात्र करोनाची भीती कमी झाल्याने सर्व गावांत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचं दिसत आहे. यंदा केवळ १५ गावांनी हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११ तर सातारा जिल्ह्यातील ४ गावांचा समावेश आहे. याशिवाय तीन जिल्ह्यातील हजारावर गावात यंदा ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. गतवर्षीपेक्षा दोनशे गावांची या उपक्रमात वाढ ही पुरोगामी चळवळ अधिक घट्ट होत असल्याची निशाणी आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून तब्बल ५९३ गावानी अशा पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेवरील देखाव्यावर कारवाई, निषेध म्हणून गणेश मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय

उत्सवावरील निर्बंध उठवले म्हणून एकीकडे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची जोरदार तयारी झाली असताना अजूनही काही गावांनी ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमाच्या माध्यमातून एकीचा संदेश कायम ठेवला आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आम्ही अनेक गावात बैठक घेत लोकांना समजावून सांगितल्याने यंदा अशा गावांची संख्या वाढली आहे, असं सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here