यंदा मात्र करोनाची भीती कमी झाल्याने सर्व गावांत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचं दिसत आहे. यंदा केवळ १५ गावांनी हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११ तर सातारा जिल्ह्यातील ४ गावांचा समावेश आहे. याशिवाय तीन जिल्ह्यातील हजारावर गावात यंदा ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. गतवर्षीपेक्षा दोनशे गावांची या उपक्रमात वाढ ही पुरोगामी चळवळ अधिक घट्ट होत असल्याची निशाणी आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून तब्बल ५९३ गावानी अशा पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेवरील देखाव्यावर कारवाई, निषेध म्हणून गणेश मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय
उत्सवावरील निर्बंध उठवले म्हणून एकीकडे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची जोरदार तयारी झाली असताना अजूनही काही गावांनी ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमाच्या माध्यमातून एकीचा संदेश कायम ठेवला आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आम्ही अनेक गावात बैठक घेत लोकांना समजावून सांगितल्याने यंदा अशा गावांची संख्या वाढली आहे, असं सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी म्हटलं आहे.