जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडविण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची ‘फोर्ब्स’ दखल घेत असते. त्या कंपनीची कामगिरी जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देत असते. ‘फोर्ब्स’ यादीत निवड व्हावी म्हणून ६५० कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. यात ग्रामहिताचाही समावेश होता. ही कंपनी शेतकऱ्यांना शेतात साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देते.
वाचा- मोटीवेशनल स्पीकर ते ब्रिटिशची स्कॉलरशिप, पुण्याच्या व्हीलचेअर गर्लची सुपर कहाणी
देशात शेतमाल विक्री सगळीकडेच एका कनिष्ठ चक्रव्यात अडकलेली आहे.पीक काढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात. स्वाभाविक व्यापारी वर्ग शेतमालाचे भाव पाडतो. देणेकरांच्या दबावामुळे व उसनवार फेडण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळे होतात.

यासाठी ग्रामहीत’ कंपनीने काही उपाय सुचवले आहे. त्यात माल साठवणुकीची उत्तम शास्त्रीय व्यवस्था तसेच साठवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धता,पुढेही शेतकऱ्याला माल विकायचा झाल्यास घरूनच मोबाईल क्लिकवर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते. वारंवार बाजारपेठात जाण्याची शेतकऱ्यांना गरज पडत नाही. अशा बाबी गावातच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाल्यास ते सोयीचे ठरते. त्यामुळे ‘ग्रामहिता’ने अशीच व्यवस्था यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतकरी कुटुंबांना मिळवून दिली. त्यांनी या पद्धतीचा लाभही उचलला आहे. त्यामुळेच ‘फोर्सचे’ ग्रामहित या संस्थेची निवडलेल्या १०० कंपन्यांमध्ये निवड केली आहे.
वाचा-रोहित शर्माबद्दल असं बोलण्याची पाकिस्तानची हिम्मत कशी झाली; पाहा काय बरळला हफीज
शेतकऱ्यांच्या हितांसाठी ‘ग्रामहीत’चा प्रवास…
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील पंकज महल्ले शेतकरी पुत्राने स्थानिक सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयातून बीएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शेती क्षेत्रात कामाचा अनुभव घेत मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी मिळवली. काही वर्ष टाटाच्याच सीएसआर प्रकल्पात मोठ्या पगारावर काम केले. श्वेता महल्ले यांनीही अभियांत्रिक पदवीनंतर हैदराबाद येथून आयआयटी पदव्युत्तर पदवी संपादन केली. मात्र ,दोघांना शेती आणी शेतकऱ्यांची ओढ गावाकडे घेऊन आली. यातूनच ‘ग्रामहिता’चा शेतकरी हिताचा प्रवास सुरू झाला.