राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीये. यानिमित्ताने सगळेच राजकीय पक्ष शक्तीप्रदर्शन करत आहेत. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांना गणेशोत्सव म्हणजे नामी संधी असते. याच पार्श्वभूमीवर भाजपने यंदा जिकडे तिकडे शिवसेना पर्यायाने उद्धव ठाकरेंना डिवचणारी बॅनरबाजी केली आहे. आपलं सरकार आलं- हिंदू सणांवरचं विघ्न टळलं, अशा आशयाचे बॅनर लावून तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणून बुजून हिंदू सणांवर बंधन लादली होती, असाच रोख भाजपच्या जाहिरातबाजीतून दिसून येत आहे.

हायलाइट्स:
- ‘आपलं सरकार आलं, हिंदू सणांवरचं संकट टळलं’, भाजपची सगळीकडे पोस्टरबाजी
- आता शिवसेनेकडून जशास तसं उत्तर, टाळ्या-थाळ्यावरुन मोदींना चिमटा, भाजपला सुनावलं
राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीये. यानिमित्ताने सगळेच राजकीय पक्ष शक्तीप्रदर्शन करत आहेत. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांना गणेशोत्सव म्हणजे नामी संधी असते. याच पार्श्वभूमीवर भाजपने यंदा जिकडे तिकडे शिवसेना पर्यायाने उद्धव ठाकरेंना डिवचणारी बॅनरबाजी केली आहे. आपलं सरकार आलं- हिंदू सणांवरचं विघ्न टळलं, अशा आशयाचे बॅनर लावून तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणून बुजून हिंदू सणांवर बंधन लादली होती, असाच रोख जाहिरातबाजीतून दिसून येत आहे. भाजपच्या याच टीकेला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर देताना मोदींनी जाहीर केलेल्या करोना काळातील लॉकडाऊन आणि मोदींचे त्याकाळातील उपक्रमांची आठवण करुन दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी करोना काळात केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य परिषदेने कौतुक केलं. न्यूयॉर्क टाइम्सने कौतुक केलं. इतकंच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. देशाच्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव सातत्याने आलं. उद्धवसाहेबांनी सर्वधर्मीयांचे प्राण करोनाच्या कठीण काळाच वाचवले. अशावेळी केंद्रात असलेल्या सरकारने काय केलं तर लॉकडाऊन लावला, टाळ्या-थाळ्या वाजवायला सांगितल्या.दिवे लावायला सांगितले. ठाकरे सरकारच्या काळात सण-उत्सवांना बंदी नव्हती, गर्दीला होती. निदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, तो विघ्नहर्ता आहे, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी भाजपच्या प्रचाराला रोखठोक उत्तर दिलंय.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.