औरंगाबाद : विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या त्रासामुळे औरंगाबादमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर, असा तगादा प्रेयसीने लावल्यामुळे गणेश मुसळे या ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे.
‘तुझ्या बायकोला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर,’ असं गणेशची प्रेयसी त्याला वारंवार सांगत असे. त्यामुळे मानिसक तणावात आलेल्या गणेश मुसळे याने अखेर स्वत:चं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या प्रकरणी गणेशच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.