Former Chairman tata sons| सायरस मिस्त्री हे २०१२ ते ऑक्टोबर २०१६ या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते. त्यांची अध्यक्षपदाची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती. सुशासन आणि पारदर्शकी व्यवस्थापनाचा आग्रह धरणाऱ्या सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहावर गंभीर आरोप केले होते. टाटा समूहाला २०१९ मध्ये १३००० कोटींचा तोटा झाला होता मात्र तो त्यांनी लपवला, असा आरोप मिस्त्री यांनी केला होता.

हायलाइट्स:
- सूर्या नदीच्या पुलावर सायरस मिस्त्री यांची कार दुभाजकाला धडकली
- ही कार अत्यंत वेगात होती
- चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची शक्यता
मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर सायरस मिस्त्री यांची कार दुभाजकाला धडकली. ही कार अत्यंत वेगात होती. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कार इतक्या वेगाने दुभाजकावर आदळली की, गाडीतील एअरबॅग्ज उघडल्या आहेत, तसेच बोनेटचा संपूर्ण भाग चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री आणि त्यांच्या चालकाला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्या गाडीच्या चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे.
सायरस मिस्त्री हे २०१२ ते ऑक्टोबर २०१६ या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते. त्यांची अध्यक्षपदाची कारकीर्द वादग्रस्त राहिली होती. सुशासन आणि पारदर्शकी व्यवस्थापनाचा आग्रह धरणाऱ्या सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहावर गंभीर आरोप केले होते. टाटा समूहाला २०१९ मध्ये १३००० कोटींचा तोटा झाला होता मात्र तो त्यांनी लपवला, असा आरोप मिस्त्री यांनी केला होता. तीन दशकांत पहिल्यांदाच टाटा समूहाला इतका प्रचंड तोटा झाला असून तो त्यांनी लेख परीक्षणात दडवला, असा दावा मिस्त्री यांनी कोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात केला होता. याच वादातून २०१६ साली त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.