पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात (Cyrus Mistry Accident) मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरजवळ घडलेल्या भीषण अपघात मिस्त्री यांनी जीव गमावला. साधारण ३ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री हे अन्य तीन व्यक्तींसह गुजरातहून मुंबईकडे येत होते. मिस्त्री हे आपल्या कारने अन्य तीन मित्रांसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येत असताना पालघरजवळ कारला भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार नदीच्या पुलाला जाऊन धडकली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. मिस्त्री यांच्यासोबत असलेल्या पंडोले नामक व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे, तर इतर दोन सहकारी जखमी झाले आहेत.

Cyrus Mistry: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये कार अपघातात मृत्यू

अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी वापी येथे नेलं असल्याची माहिती आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

दरम्यान, या अपघाताप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here