दुबई: आशिया कप २०२२ मध्ये रविवारी सुपर -४ स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान यांची लढत झाली. या लढतीत पाकिस्तानने ५ विकेटनी विजय मिळवला. सामन्यात अटीतटीच्या क्षणी भारताचा युवा जलद गोलंदाज अर्शदीप सिंहकडून एक सोपा कॅच सुटला. यानंतर भारताने सामना गमावला.

अर्शदीप सिंहच्या या चुकीनंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली. इतक नाही तर सोशल मीडियावर तो ट्रोल देखील झाला. धक्कादायक म्हणजे विकीपीडियावरील अर्शदीप सिंगच्या पेजवर काही बदल करण्यात आले आणि त्याचे आणि खलिस्तान संघटनेशी संबंध असल्याचे म्हटले गेले.

वाचा- Video: रोहित शर्माचा असा रुद्रावतार कधीच दिसला नाही, पाहा अस काय झालं १८व्या..

या प्रकरणी आता भारत सरकार तातडीने सक्रीय झाली असून त्यांनी माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाकडून विकीपीडियाला नोटीस पाठवली आहे. आयटी मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्शदीप सिंगच्या विकीपीडिया पेजवर तो खलिस्तानचा समर्थक असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा पद्धतीचे वक्तव्यामुळे भारतातील वातावरण बिघडू शकते. इतक नाही तर अर्शदीप सिंगच्या कुटुंबाला देखील यामुळे धोका होऊ शकतो.

वाचा- आठ वर्षानंतर भारताविरुद्ध पाकिस्तान जिंकला; रोहितचे कुठे चुकले; या ३ गोष्टींमुळे झाला

काय झालं मॅचमध्ये…

रविवारी ४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान सामन्यातील १८व्या षटकात अर्शदीपकडून एक सोपा कॅच सुटला. त्याच्याकडून झालेल्या त्या एका चुकीमुळे भारताला मॅच गमवावी लागली. कारण त्याने ज्या खेळाडूचा कॅच सोडला होता त्या असिफ अलीने १९व्या षटकार आणि चौकार मारले. भारताने मॅच गमावल्यानंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

वाचा- भारत-पाकिस्तान मॅच: रवी शास्त्री फुल जोशात, रोहित शर्माला हसू आवरता आले नाही, Video

या सामन्यात अखेरच्या षटकात पाकिस्तानला ६ चेंडूत ७ धावांची गरज होती तेव्हा अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली. अर्शदीपने विजयासाठी पाकिस्तानला ५व्या चेंडूपर्यंत झुंजवले. त्याने ३.५ चेंडूत २७ धावा देत १ विकेट घेतली.

1 COMMENT

  1. Itís hard to come by educated people in this particular subject, but you seem like you know what youíre talking about! Thanks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here