india vs sri lanka asia cup 2022: पाकिस्तानविरुद्ध ५ गड्यांनी पराभव झाल्यामुळे आज भारतीय संघ विजयाच्या निर्धारानं मैदानात उतरेल. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड संघ निवडताना काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतात.

भारताकडून टी-२० सामन्यांत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यझुवेंद्र चहललादेखील बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. रवी बिश्नोईनं पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली. त्यानं दोन फलंदाजांना बाद केलं. मात्र चहलची कामगिरी अतिशय खराब झाली. त्यामुळे चहलला आज संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे.
ऋषभ पंतच्या जागी पुन्हा एकदा दिनेश कार्तिकला संधी दिली जाऊ शकते. तर भारताकडून सर्वाधिक टी-२० विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर असलेल्या चहलच्या जागी अक्षर पटेलला जागा मिळू शकते. पटेलची निवड रविंद्र जाडेजाच्या जागी झालेली आहे. मोक्याच्या क्षणी झेल सोडल्यानं टीका होत असलेल्या युवा गोलंदाज अर्शदीपचं संघातलं स्थान निश्चित मानलं जात आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.