ठाणे : ठाकुर्ली आणि कल्याणजवळील पत्रिपुलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना मंगळवारी आज सकाळी ६.३५ च्या सुमारास घडली. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या. लाईनमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला असून त्याने ट्रक फ्रॅक्चर असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती.

घटनास्थळी रेल्वेचे तांत्रिक विभागाचे कर्मचारी जाऊन त्यांनी ट्रॅक दुरुस्ती केली आणि सकाळी ७.१५ च्या सुमारास वाहतूक सुरू झाली. त्यानंतर हळूहळू डाऊन जलद मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली असली तरी सकाळच्या या घोळामुळे प्रवाशांचे हाल झाले. लांब पल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी ताटकळले तसेच कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. तासभर गाड्यांना विलंब झाल्याने पुढचा सर्व प्रवास तसाच असल्याने अनेकांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरवले गेले.

कोल्हापूरकरांनी करुन दाखवलं, इथं फक्त राजर्षी शाहूंचा विचार चालतो, ३ लाख गणेश मूर्तीचं दान
लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्याचा परिणाम लोकल सेवेवरही झालेला पाहायला मिळत आहे. कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, रेल्वे गाड्या उशीराने धावणार असल्या तरी लाइनमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. त्यामुळे दोन्ही लाइनमनचेही कौतुक केलं जात आहे.

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाणार, नव्या मैत्रीचा ‘श्रीगणेशा’ होणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here