Tata Sons former chairman | टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर येथे झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर दाहसंस्कार झाले. यानंतर सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

हायलाइट्स:
- सायरस मिस्त्री अनंतात विलीन
- सायरस मिस्त्री यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
- पालघर परिसरात झालेल्या भीषण कार अपघातामध्ये निधन झाले होते
सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी पालघर परिसरात झालेल्या भीषण कार अपघातामध्ये निधन झाले होते. त्यांची मर्सिडीज कार दुभाजकावर आदळली होती. यामध्ये सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे सायरस मिस्त्री जागीच गतप्राण झाले होते. सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी दुपारी मुंबईच्या वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच पोलिसांकडून या अपघाताची सखोल चौकशी सुरु आहे. हा अपघात कसा झाला, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारमधील चिप जर्मनीला पाठवली जाणार आहे.
‘सायरस मिस्त्री हक्कानं फोन करायचे, वरणभात, खिचडी करुन ठेव म्हणायचे’
सायरस मिस्त्री यांचे रविवारी निधन झाले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. सायरस मिस्त्री खूप साधेपणानं वागत होते. ते अतिशय साधेपणानं वागायचे. मला ते फोन करुन सांगायचे की जेवायला येणार आहे, वरण भात, थालीपीठ, शेवपुरी पाहिजे, खिचडी पाहिजे इतकं हक्काने ते सांगायचे त्यांचा अपघाती मृत्यू होणं हे खूप धक्कादायक आणि सदानंद सुळे आणि माझ्यासाठी वैयक्तिक हानी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.