Authored by विकास दळवी | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 7, 2022, 11:47 AM
Hingoli News : हिंगोलीत शेतात काम करताना एका १७ वर्षीय मुलाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. आई-वडिलांच्या डोळ्यादेखत या मुलाने आपले प्राण सोडले आहेत. या घटनेने सेनगाव तालुक्यातील व वेलतूरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हायलाइट्स:
- आई-वडिलांच्या डोळ्यासमोर १७ वर्षीय मुलाने सोडला प्राण
- शेतात काम करत असताना कोसळली विज
- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील घटना
हिंगोली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. मात्र, काल मंगळवारी चार ते पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस पडला. महेश आणि त्याचे आई-वडील शेतात निंदनाचे काम करत होते व महेश कापलेले गवत फेकत होता. मात्र, यावेळी अंगावर वीज पडून महेशचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्याला तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने सेनगाव तालुक्यातील व वेलतूरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी सुद्धा यंदाच्या पावसाळ्यात शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यांनी काही गावात जाऊन मार्गदर्शन सुद्धा केले होते. परंतू बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात सुरेक्षेसाठी घर नसल्यामुळे अशा घटना घडतात. पाऊस सुरु होण्याआधी सुरुक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा जेणेकरुन अशा घटना घडणार नाहीत.
आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट लावणे बंधनकारक | नितीन गडकरी
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.