या महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. करोनामुळे होरपळलेल्या या महिलांचे प्रश्न, अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यासाठी तसंच स्वतंत्र धोरण, योजना आखण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी यावेळी सांगितले.
Home Maharashtra ahmednagar corona updates, ‘करोनात आधी सासरे, नंतर पती आणि वडील गमावले…आम्हाला विधवा...
ahmednagar corona updates, ‘करोनात आधी सासरे, नंतर पती आणि वडील गमावले…आम्हाला विधवा नको, एकल महिला म्हणा’ – emotional reactions of women who lost family members in the corona virus pandemic
अहमदनगर : ‘करोनाच्या पहिल्या लाटेत माझे सासरे, नंतर पती, तर दुसऱ्या लाटेत मी वडील गमावले. करोनामुळे आमच्या कुटुंबावर काय संकट आले…आमचे काय हाल झाले? हे आमचे आम्हालाच माहीत. आता आम्ही कुठे त्यातून सावरत आहोत. अजूनही आमच्या मनाच्या जखमा भरलेल्या नाहीत. पण समाजाला हात जोडून एकच सांगणं आहे, आम्हाला विधवा म्हणू नका, तर एकल महिला म्हणा. विधवा म्हटलं की मनाला प्रचंड वेदना होतात,’ असं सांगत कधीही हाती माईक न घेतलेल्या संगिता संदीप कुरूंद या करोना एकल महिलेने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.