चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दोन थरारक घटना घडल्या आहेत. नदीच्या पुलावर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहने थेट नदीवरील पुलाला जाऊन आदळली. मात्र लटकत असलेली ही वाहने सुदैवाने नदीत मात्र कोसळली नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
दुसरीकडे, वैनगंगा नदीवरील हरणघाट पुलावरही असाच काहीसा प्रकार घडला आहे. धान्याचे पोते भरलेला ट्रक मूल शहराकडे जात असताना वैनगंगा नदीच्या हरणघाट पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला ट्रकने धडक दिली. मात्र हा ट्रकही नदीपात्रात कोसळला नाही. पुलाच्या कठड्यावर लटकलेला ट्रक बघून ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय उपस्थितांना आला.