जळगाव: पत्नी माहेरी गेल्यानंतर घरी एकट्या असलेल्या पतीनं केल्याची घटना जळगावातील सिद्धार्थ नगरातील रामेश्वर वसाहतीत घडली आहे. विजय यशवंत अटकाळे (वय २८ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पत्नी माहेरी गेल्यानंतर विजय रात्री नातेवाईकांकडे गेला होता. तिथे त्यानं सर्वांशी गप्पा मारल्या. त्यानंतर घरी येऊन आत्महत्या केली.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय अटकाळे हा पत्नी व मुलासह रामेश्वर कॉलनीतील सिद्धार्थ नगरात वास्तव्याला होता. मजुरी आणि हमाली काम करून तो उदरनिर्वाह करायचा. काही दिवसांपासून त्यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे तो घरी एकटाच होता. मंगळवारी रात्री गल्लीतील नातेवाईकांशी गप्पा मारून विजय घरी परतला.

विजयने राहत्या घरात गळफास मध्यरात्री आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. यासंदर्भात शेजाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. विजय यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विजयच्या पश्चात वडील यशवंत गोविंद अटकाळे, आई शिला, भाऊ राकेश, दोन विवाहित बहिणी, पत्नी गीता व मुलगा परिस असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here