Internal Politics in BJP | याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये (Bada Kabrastan South Mumbai) दफन करण्यात आला होता. त्याच ठिकाणी त्याच्या कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या वृत्ताने काल एकच खळबळ उडाली होती. तेव्हा शिवसेना सरकारमध्ये असली तरी आमचे कितपत ऐकले जात होते, हे तुम्हाला माहिती आहे.

 

Aaditya Thackeray Devendra Fadnavis
आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • भाजपच्या नेत्यांनी कालपासून हा मुद्दा लावून धरला आहे
  • आज होत असलेले आरोप हे खोटे आणि घाणेरडे आहेत
  • याकुबचे दफन इतक्या मानसन्मानाने का झाले?
मुंबई: दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून भाजपने ठाकरे सरकारविरोधात रान उठवले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. याकूब मेमनला (Yakub Memon) फाशी देण्यात आली आणि त्यानंतर त्याचे मानसन्मानाने दफन झाले, तेव्हा सरकार कोणाचे होते? तेव्हा शिवसेना सरकारमध्ये असली तरी आमचे कितपत ऐकले जात होते, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता भाजपमधील (BJP) जे नेते आरोप करत आहेत, ते आमच्यावर चिडलेले आहेत की त्यांच्याच पक्षातील अंतर्गत वादामुळे हे सगळे घडले आहे, असा सवाल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उपस्थित करा. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. यावरुन काय तो निष्कर्ष काढावा, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
खुर्ची टिकवण्यासाठी हिंदुत्वाशी तडजोड, ठाकरे माफी मागा, याकूब मेमन कबर प्रकरणी बावनकुळेंचा हल्लाबोल
याकूब मेमनच्या कबरीच्या सुभोभीकरणाची माहिती समोर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी कालपासून हा मुद्दा लावून धरला आहे. आज होत असलेले आरोप हे खोटे आणि घाणेरडे आहेत. मला वाटत नाही की, लोकांना हे आरोप पटतील. धार्मिक वाद निर्माण करायचा म्हणून अशा गोष्टी उकरून काढणे, कितपत योग्य आहे. यामध्ये दोन-तीन गोष्टी लोकांसमोर येणं गरजेचे आहे. याकूब मेमनला दहशतवादी म्हणून फाशी झाली होती तर त्याचं दफन इतक्या मानसन्मानाने का झाले? त्यावेळी इतकी गर्दी का होऊन देण्यात आली? ओसमा बिन लादेनला जशाप्रकारे समुद्रात दफन केले तसेच याकूब मेमनच्या बाबतीत का घडले नाही? याकुब मेमनचा मृतदेह ज्या ट्रस्टकडे देण्यात आला, ती ट्रस्ट खासगी होती. या ट्रस्टने त्यावेळी महानगरपालिकेकडून एनओसी घेतलाच नव्हता. तसेच एखाद्या दफनभूमीतील कबर १८ महिन्यांनी रोटेट करावी लागते. ते २०१६ मध्येच व्हायला पाहिजे होते, ते झालेच नाही. तेव्हा सरकार कोणाचे होते, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
याकूब मेमनच्या कबरीची सजावट; फोटो ट्विट करत भाजपचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
पेंग्विनसेना म्हणत असाल तर मला त्याचा अभिमान वाटतो: आदित्य ठाकरे

भाजपकडून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला पेंग्विनसेना म्हणून डिवचण्यात येते. आदित्य ठाकरे यांच्याच पुढाकाराने राणीच्या बागेत परदेशातून पेंग्विन आणण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, आम्हाला पेंग्विनसेना म्हटले जात असेल तर त्याचा अभिमान आहे. राणीच्या बागेत पेंग्निन आणल्यामुळे पर्यटाकांची संख्या वाढली. त्यामुळे तोट्यात असणारी राणीची बाग फायद्यात आली. त्यामुळे पेंग्विनवरुन चिडवले जात असेल तर मला त्याचा अभिमानच आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here