मुंबई : विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा मुंबई आणि उपनगरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. काही वेळापासून पूर्व मुंबई उपनगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि घाटकोपर परिसरामध्ये जोरदार सरी बरसत आहेत. परिणामी लोकल सेवाही विस्कळीत झाली असून कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

पूर्व मुंबई उपनगर परिसरात पडत असलेल्या पावसाचा फटका हा सकल भागात राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. भांडुपमधील कोकण नगर, सह्याद्री नगर, बुद्ध नगर, पठाण तबेला या परिसरात जलमय स्थिती झाली आहे. या परिसरातील रखडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पामुळे परिसरात नाला रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावर तसंच थेट घरांमध्ये शिरत आहे.

शिंदे गटातील खासदारांची डोकेदुखी वाढणार? सदाशिव लोखंडेच्या मतदारसंघातही भाजपची फिल्डिंग

दरम्यान, ऐन गणेशोत्सव काळामध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांची प्रचंड दैना उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here