Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या वरळी येथील बीडीडी चाळीला देखील भेट दिली होती. त्यावेळी पोलीस कुटुंबीयांनी माझ मनापासून स्वागत केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. . हा आपलाच मुख्यमंत्री या भावनेतून मनापासून मिळालेला प्रतिसाद होता. त्यांचे भरभरून प्रेम आणि आशिर्वाद मिळत असल्याने त्यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचे शिंदे म्हणाले.

हायलाइट्स:
- मी फिरायला लागल्यामुळे अनेक लोक फिरायला लागले आहेत
- त्यांना मिळणारे पुण्य हे मी फिरल्यामुळे मिळत आहे
- त्यांनी ते पुण्य आनंदाने घ्यावे
मी फिरायला लागल्यामुळे अनेक लोक फिरायला लागले आहेत. त्यांना मिळणारे पुण्य हे मी फिरल्यामुळे मिळत आहे. त्यामुळे त्यांनी ते पुण्य आनंदाने घ्यावे. ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. काही लोक म्हणतात, मी कॅमेरे घेऊन जातो. पण माझ्याकडे कॅमेरा नसतो, लोक माझ्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करतात. मी प्रत्येक ठिकाणी जातो. तेथील लोकांना असं वाटत की, हा आपला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्या भावनेने फोटो काढायला येतात. लोकांना ज्याच्या जवळ जावसं वाटत त्याच्याकडेचं फोटो काढायला येतात. आता बाकी लोकांच्याजवळ ते का जात नाहीत, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. आम्ही अशाच ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी कॅमेरा घेऊन जाऊ शकतो, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना लगावला आहे. मी मुख्यमंत्री होण्याआधी जसा होतो, तसाच आज पण आहे आणि आपला मुख्यमंत्री म्हणून सर्व लोक प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने माझ्याकडे येतात. त्यामुळे त्यांच्यासोबत मी फोटो काढतो आणि त्यात मला काही गैर वाटत नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याची टीका त्यांनी केली होती. एक मुख्यमंत्री राज्याचा कारभार पाहण्यासाठी आणि एक मुख्यमंत्री फिरण्यासाठी हवा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. याशिवाय, अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. या सगळ्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागतं. लोक मला आपुलकीनं बोलवत असतात त्यामुळे त्यांना नाकारता येत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा, त्याचा बारामतीकर नक्की विचार करतील | अजित पवार
देशद्रोह्याचे उदात्तीकरण महाराष्ट्र खपवून घेणार नाही: एकनाथ शिंदे
दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा सध्या तापला आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. याकूब मेनन हा बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असून देशद्रोही होता. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचे उदात्तीकरण महाराष्ट्र खपवून घेऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांना आणि महापालिकांना सूचना दिल्या असून त्यावर लवकरच गृहविभागाकडून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.