गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथील जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास अमिर्झा-गडचिरोली मार्गापासून दीड किलोमीटर अंतरावर कक्ष क्रमांक ४१५ या जंगलात घडली. कृष्णा महागू ढोणे (रा. कळमटोला) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

घटनेची माहिती प्राप्त होताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सातत्याने वाघाचे हल्ले होत असल्याने शेतकरी प्रचंड भयभीत झाले आहेत. जिथं वाघाचं अस्तित्व आहे त्या जंगलात एकट्याने जाऊ नये, असं वनविभाग वारंवार सांगत असतानाही अनेक जण सूचनांकडे डोळेझाक करत असल्याने वाघाच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Amravati Missing Girl: आरती सिंह यांची गणपतीनंतर उचलबांगडी; पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर रवी राणांचा सूचक इशारा

वाघाने कालच घेतला एकाचा बळी

मशरूम गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमाला वाघाने ठार केल्याची घटना ८ सप्टेंबर सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील उसेगाव नजीक घडली होती. प्रेमपाल तुकाराम प्रधान ( ४५) रा. उसेगाव असं वाघाच्या हल्ल्यात काल ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

सीटी १ नामक हा वाघ आहे. विशेष म्हणजे नुकतंच या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून विशेष पथक या परिसरात दाखल झाले. परंतु याच वाघाने इसमाचा बळी घेतला. देसाईगंज व आरमोरी तालुक्यात सध्या सीटी १ या वाघाचा वावर असल्याने वनविभागाने नागरिकांना जंगलात जाण्यास मनाई केली आहे. असं असतानाही प्रेमपाल हा एका मित्रासह काल ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात मशरूम गोळा करण्यासाठी गेला होता.

दरम्यान, जवळच दबा धरून बसलेल्या सीटी १ या वाघाने प्रेमपालवर हल्ला करून त्यास ठार केले. आज पुन्हा एका इसमाला वाघाने ठार केलं असून जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढल्याने नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here